Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
पुष्पा-2 अर्थात पुष्पा-द रुल या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा चालू आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, ङ्गहाद ङ्गासील यांच्या कामाचे सिनेरसिक कौतुक करत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑङ्गिसवरही सगळे रेकॉर्ड मोडताना दिसतोय. दरम्यान, एकीकडे तुङ्गान प्रतिसाद मिळत असताना हा चित्रपट आता वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. राजपूत समाजाच्या नेत्यांनी खलनायकाच्या शेखावत या नावावर आक्षेप घेतला असून हा क्षत्रियांचा अपमान आहे, असं म्हटलंय. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राजपूत समाजाचे नेते राज शेखावत यांनी पुष्पा-2 चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी या चित्रपटाबाबतचे आपले आक्षेप नोंदवले आहेत. या चित्रपटातील भवरसिंह शेखावत या पात्रावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. हे पात्र ङ्गहाद ङ्गॉसील या अभिनेत्याने साकारलेले आहे. या पात्रामुळे शेखावत समाजाची नकारात्मक प्रतिमा उभी राहात आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच या चित्रपटातील शेखावत हा शब्द सगळीकडून काढून टाकावा, अशी मागणीही त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे. हे नाव न हटवल्यास आगामी परिणाम आणि पडसादांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
’’पुष्पा-2 या चित्रपटात शेखावत नावाचे नकारात्मक भूमिका साकारणारे पात्र आहे. हा क्षत्रियांचा अपमान आहे. करणी सेनेच्या सैनिकांनो तयार राहा. या चित्रपटाच्या निर्मात्याला लवकरच धडा शिकवला जाईल,’’ असं शेखावत यांनी म्हटलंय. तसेच या चित्रपटात शेखावत समाजाला मुद्दामहून नकारात्मक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिव्यक्तीस्वातंर्त्याच्या नावाखाली हा क्षत्रियांचा अपमान आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
चित्रपटातून शेखावत हे नाव लवकरात लवकर काढून टाकावे अन्यथा करनी सेना कठोर भूमिका घेईल, असा इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळे आता चित्रपटाचे निर्माते नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.