शालेय विद्यार्थ्यांसाठी

Spread the love

शालेय विद्यार्थ्यांसाठी​

सुविचार :

_mUgmZo _moRo>nU Ë`mZo {H$Vr _mUgo _moR>r Ho$br `mdéZ {gÕ hmoVo.

JmonmiH¥$îU JmoIbo
.....

संस्कृत सुभाषित

ये यथा वर्तन्ते यास्मिंन् तस्मीन् एव प्रवर्तयन्।

न अधर्म समवाप्नोति, न अभ्रेयश्च विन्दति ।।

अर्थ – एखादा दुसरा आपल्याशी जसा वागेल त्याच्याशी तसेच वागा. असे करण्यात कोणताही अधर्म नाही किंवा अश्रेेय म्हणजे वाईटपणा काही नाही.

 

गुरु वचन

 

अशुभ झाले शुभ : आचार्य शिवेंद्र नागर

सद्पुरुषचे लक्षण काय? संसारासासाठी निरर्थक असलेल्या वस्तुंनी तो व्यक्ती संतुष्ट आहे. गल्लीतल्या कपड्याच्या तुकड्याने ज्याने शाल बनवली आहे, त्याचे मन, पाप-पुण्यापेक्षा मोठे आहे. असा योगी कधी बालकाप्रमाणे खेळतो तर कधी वेडा होतो. त्यास खेळताना पाहून तो वेडा झाला असे समजू नका. वेड्यासारखे समजा, बालकाप्रमाणे माना. त्याच्या शरीराला कमीत कमी वस्तूंची गरज आहे व त्यावर संतुष्ट आहे. आपण जितक्या जास्त वस्तूंवर अवलंबून आहोत, तितके जास्त दु:खी आहोत.

50 वर्षापूर्वी स्वयंपाक घर आजच्या इतकी संपन्न नव्हते. आज आपल्याकडे मिक्सर, गिझर, कुलर, कुकर, मायक्रोवेव्ह अवन आहे. वेळ सुद्धा आहे पण त्या वेळेची तरतूद कुठे होत आहे. जितके जास्त आपण वस्तुंवर अवलंबून राहू, तितके आपले दु:ख वाढते. जर अमेरिकेत कोक बंद झाले तर लोक तो धक्का कसे सहन करतील. जर भारतात चहावर बंदी लावण्यात आली तर काय होईल!

शब्द -विषय अर्थात् यरू विश इति। जे विष आहे, ते नियंत्रित केले पाहिजे. तुम्ही एखादे औषध घेता तेव्हा त्यावर लिहिले असते की ’पॉयझन’ म्हणजे काय? जर याचा दुरुपयोग केला म्हणजे जास्त मात्रात घेतले तर तुम्ही दगावू शकतात. ज्या माणसाच्या गरजा कमी आहेत, ज्याचे शरीर योगात आहे, तो यामुळे जास्त प्रभावित होणार नाही. तो पाप-पुण्य, शुभ-अशुभ विचारातून मुक्त आहे. आपल्या डोक्यात शुभ-अशुभ फिट झाले आहे. दक्षिण भारतात डोक्यावर पदर घेणे अशुभ मानले जाते, उत्तर भारतात डोक्यावर पदर घेणे शुभ मानले जाते. पंजाबमध्ये उडीद दाळ शुभ प्रसंगी खाल्ली जाते व उत्तर प्रदेशात उडीद दाळ मृत्यू प्रसंगी खाल्ली जाते. उडीद दाळ एका ठिकाणी शुभ तर इतर ठिकाणी अशुभ आहे. एका ठिकाणी डोक्यावर पदर घेणे शुभ आहे तर दुसèया ठिकाणी अशुभ.

50 वर्षापूर्वी मुलींचे नोकरी करणे अशुभ होते, ते आज शुभ झाले. विदुर नीतित दूध विकणे आई विकण्यासारखे आहे. काळ बदलला. दुध विकणे वाईट पण विना नफा-तोटा तत्वावर विकणे योग्य आहे. काळ आणखी बदलला. दूध विकणे योग्य आहे त्यात थोडा नफा झाला तर चालते पण कमीत कमी पाणी टाकून विकावे. आज तर दुध विकणे, नफा कमावणे, पाणी टाकणे सुद्धा योग्य पण स्वच्छ पाणी टाकून तरी विका.

काही काळापूर्वी जी गोष्ट शुभ होती ती आज अशुभ होऊ शकते. काही काळापूर्वी जे अशुभ होते ते आज शुभ असू शकते. पाप-पुण्याच्या फेèयातून संत वर आले आहेत. गीतेत वारंवार येते की, दोन्ही सैन्यांमध्ये कौरव नकारात्मक, पांडव सकारात्मक दिसतात. ज्ञानी चांगल्या-वाईटातून वर येतो. असा माणूस संसारात बालकाप्रमाणे आहे.

मुलांना येणाèया काळाची चिंता किंवा गतकाळाचे दु:ख नाही. ज्ञानी व्यक्ती मुलाप्रमाणे आहे. मुलं नेहमी वर्तमानात राहतात. शंकराचार्य म्हणतात की, ज्ञानी व्यक्ती वेड्याप्रमाणे असतो. तो ज्या पातळीवर आहे, ते आपणास समजू शकत नाही. त्याच्यासाठी कुणी आपले किंवा त्रयस्त नाही. ज्या शरीराच्या गरजा कमी आहेत, जे पाप-पुण्यापेक्षा वर आहेत, ते लोक वेड्याप्रमाणे आहेत, ते बालकाप्रमाणे आहेत.

उपदेशकथा

 

एडिसन

जगदविख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्या प्रयोगशाळेला 1914 मध्ये आग लागली. या आगीत त्यांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाची कागदपत्रे, यंत्रसामग्री जळून खाक झाली. या आगीची वार्ता समजताच त्यांचा मुलगा चार्ल्स एडिसन त्यांना भेटायला, मदत करायला धावत आला तेव्हा थॉमस एडिसन त्याला म्हणाले, ’’ अरे पाहत काय उभा राहिलास ? तुझ्या आईला चटकन बोलावून आण. असे दृश्य पुन्हा पाहायला मिळणार नाही.’’ दुसèया दिवशी आपल्या आशा – आकांक्षांची आणि स्वप्नांची झालेली ती राखरांगोळी पाहताना ते म्हणाले, ’’ सारी सामुग्री नष्ट होण्याचे खूप फायदे झाले. त्यामुळे माझ्या चुकाही जळून खाक झाल्या. आता मी नव्या जोमाने कामाला सुरुवात करु शकेन. एका अर्थी ही परमेश्वराची कृपाच म्हणायची !’’

 

इतिहासात आजचा दिवस – 19 मार्च 

अंतरराष्ट्रीय 

1945 – जपानमध्ये कमीकेज हल्ल्यात 800 ठार.

1950 – बेब डीड्रीक्सन-झहारियसने पाचवा युएस ओपन गोल्फ चॅम्पीयनशीप जिंकली.

1982 – नॅशनल गॉर्ड जेट टँकरच्या अपघातात 27 ठार.

1995 – जपानमध्ये विषारी गॅसने 5 जणांचा बळी.

2007 – पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमाम उल हक याने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.


राष्ट्रीय 

1972 – भारत आणि बांगलादेश दरम्यान मैत्री करार.

2007 – पेस व डॅमने पॅसिफिक लाइफ ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीचे अजिंक्यपद जिंकले.

2008 – महाराष्ट्राचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी राज्याच्या विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. माजी अर्थमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यानंतर पाटील हे सलग दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणारे एकमेव अर्थमंत्री ठरले.


जन्म

1777 – डॅच शिक्षण मंत्री अंटन आर.फ्लक यांचा जन्म.

1851 – अर्जेंटिनियाचे राष्ट्रपती रोकी सेन्ज़ पेना यांचा जन्म.

1889 – पोर्तगालच्या शेवटचा राजा मनोईल दुसरा यांचा जन्म.


निधन

1702 – इंग्लंडचा राजा विलियम तिसरा हेन्री याचे निधन.

1974 – फॅशन डिझायनर अनी क्लीनचे निधन.

1982 – अभिनेता अ‍ॅलन बडेल याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

2008 – आर्थर सी. क्लार्क, अवकाश, विज्ञान आणि भविष्य या विषयांबद्दलचे द्रष्टे लेखक यांचे निधन.

2008 – रघुवरन, प्रसिद्ध अभिनेता यांचे निधन.