शालेय विद्यार्थ्यांसाठी

Spread the love

शालेय विद्यार्थ्यांसाठी​

सुविचार :

àË`oH$ ì`º$rV H$mhr Zm H$mhr gm_Ï`© AgVoM.

- Am`© MmUŠ`
.....

गुरु वचन

प्रेम स्वातंत्र्याची किंमत नव्हे! : ओशो

आम्हाला सर्व हवे आहे पण आम्हाला प्रेम स्वातंत्र्याच्या किमतीवर नकोय. आपल्याला दोन्ही कसे मिळू शकते? मला माझे स्वातंत्र्य हवे आहे. मी माझ्या प्रेयसीला स्वातंत्र्य देतो पण मला तिचे लक्ष ठेवण्याच्या रुपात दु:ख मिळते. प्रेयसीला स्वातंत्र्य देण्याचा तुमचा विचारच चुकीचा आहे. प्रेयसीला स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण आहात? तुम्ही प्रेम करू शकतात व तुमच्या प्रेमात स्वातंत्र्य आहे. ही गोष्ट दुसऱ्याला देण्यासारखी नाही. जर देण्यास आली तर तिच अडचण येईल जिचा तुम्ही सामना करत आहात.
खरंतर तुम्ही स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही. तुम्हाला वाटेल की, स्वातंत्र्य देण्यासारखी परिस्थितीच निर्माण होऊ नये पण तुम्ही अनेकदा मला प्रेम स्वातंत्र्य देते, हे सांगताना ऐकले असेल म्हणून स्वातंत्र्य देण्यासाठी स्वत:वर दबाव टाकतात कारण तुमचे प्रेम, प्रेम नसते.
तुम्हाला एका अवघड प्रश्नात अडकले आहात. जर तुम्ही स्वातंत्र्य दिले नसते तर तुम्हाला प्रेमावर संशय आला असता. जर तुम्ही इच्छा नसूनही स्वातंत्र्य दिले तर हजार प्रश्न निर्माण होतात. तुम्ही तुमच्या प्रेयसीसाठी पुरेसे नाहीत? की तिला दुसऱ्याची साथ हवी म्हणून तिला स्वातंत्र्य हवे आहे? यामुळे दु:ख होते व तुम्ही विचार करतात की, तुम्ही आपल्यापेक्षा कमी महत्व देतात.
तिला स्वातंत्र्य देऊन तुम्ही इतरास पहिले ठेवले व नंतर स्वत:ला. हे अंहकाराविरुद्ध आहे व यामुळे काही फायदा होणार नाही कारण तुम्ही जे स्वातंत्र्य दिले आहे त्यासाठी तुम्ही बदलणार.
दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमची प्रेयसी दुसऱ्यासोबत राहिली असेल तर तुम्हाला आपल्या प्रेयसीसोबत राहणे वेगळे वाटेल. यामुळे तुमच्या व तिच्यात अडथळा निर्माण होईल. तिने दुसऱ्याची निवड केली आहे व तुम्हाला सोडून दिले आहे किंवा तिने तुमचा अपमान केला आहे.
व तुम्ही तिला खुप काही दिले आहे, तुम्ही उदार होत आहोत, तुम्ही तिला स्वातंत्र्य दिले आहे. तुम्हाला दुखावल्यासारखे जाणवत आहे म्हणून तुम्ही तिला कुठल्यातरी रुपात दुखवाल.
पण हे सर्व गैरसमजामुळे होते. मी हे म्हणालो नाही की, तुम्ही प्रेम करत असाल तर तुम्हाला स्वातंत्र्य द्यावे लागेल. नाही मी म्हणालो आहे की, प्रेम स्वातंत्र्य आहे. येथे प्रश्न देण्याचा नाही. जे जसे आहे त्याला तसेच राहू द्या. विनाकारण गुंतागूंत का वाढवायची? अगोदरच अनेक अडचणी आहेत.
जर तुमचे प्रेम त्या पातळीपर्यंत आले आहे की, स्वातंत्र्य तिचे अंग बनले आहे तेव्हा तुमच्या प्रेयसीला परवानगी घेण्याची गरजच राहणार नाही. जर मी तुमच्या जागी असतो व माझ्या प्रेयसीने परवागनी मागितली तर मला दु:ख झाले असते. याचा अर्थ तिला माझ्या प्रेमावर विश्वास नाही. माझे प्रेम स्वातंत्र्य आहे. मी तिच्यावर प्रेम केले आहे याचा अर्थ असा नव्हे की, मी सर्व मुभा दिली ज्यामुळे ती कुणासोबतही हसू शकेल, कुणासोबतही नृत्य करु शकेल, कुणावर प्रेम करु शकणार नाही कारण आपण कोण आहोत?
आपण कोण आहोत? हा मुळ प्रश्न आहे, जो सर्वांनी केला पाहिजे. आपण सर्व अनोळखी आहोत व या आधारावर आपण सांगू शकतो की, मी तुला स्वातंत्र्य देईल किंवा मी तुला स्वातंत्र्य देणार नाही. जर तु माझ्यावर प्रेम करत असेल तर दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही? या सर्व मूर्ख गोष्टी आहे पण या सर्व मानवावर सुरुवातीपासून हावी राहिल्या आहेत व आपण अजूनही असभ्य आहोत. प्रेम काय असते? हे आपणास अजूनही माहित नाही.
जर मी कुणावर प्रेम करत असेल तर मी त्या व्यक्तीप्रती कृतज्ञ असतो की तिने मला प्रेम करू दिले, तिने माझे प्रेम स्वीकारले. हेच पुरेसे आहे. मी तिच्यासाठी कैदखाना बनत नाही. तिने माझ्यावर प्रेम केले व बदल्यात मी तिच्या चहुबाजूस कैदखाना बनवत आहे? मी तिच्यावर प्रेम केले व बदल्यात ती माझ्या चहुबाजूस कैदखाना बनवत आहे? आम्ही एकमेकांना चांगला पुरस्कार देत आहोत.
जर मी कुणावर प्रेम करतो तेव्हा मी तिचा कृतज्ञ असतो व तिचे स्वातंत्र्य कायम असते. मी तिला स्वातंत्र्य दिले नाही. हा तिचा जन्मसिद्ध हक्क आहे व माझे प्रेम तिचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. तुमचे प्रेम असलेल्या व्यक्तीकडून तुम्ही तिचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकता? मी तिला स्वातंत्र्य देतो असे सुद्धा तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्ही कोण आहात? एक अनोळखी. तुम्ही दोघे योगायोगाने रस्त्यावर भेटले व तो महान आहे की, त्याने तुमचे प्रेम स्वीकारले. त्याच्याप्रती कृतज्ञ रहा व ज्याप्रमाणे जगू इच्छिता त्याप्रमाणे त्यास जगू द्या व तुम्हाला जसे जगायचे असेल तर जीवन जगा. तुमच्या जीवनशैलीत कुणी हस्तक्षेप करणार नाही. यास स्वातंत्र्य म्हणतात. तेव्हा प्रेम कमी तणावपूर्ण, कमी चिंतागस्त, कमी क्रुद्ध व जास्त प्रसन्न होण्यास मदतगार ठरेल.
जगात नेमके याउलट होत आहे. प्रेम खुप दु:खदायी असते व असेही लोक आहेत जे अखेरीस कुणावरही प्रेम न चांगले असा निर्णय घेतात. ते आपल्या मनाचे दरवाजे बंद करतात.
पण प्रेमासाठी दरवाजा बंद करण्याचा अर्थ वास्तविकतेकडे, अस्तित्वाकडे पाठ फिरवणे आहे म्हणून मी याचे समर्थन करणार नाही. मी म्हणेन की, प्रेमाचे संपूर्ण स्वरूप बदला.

उपदेशकथा

एकदा वासुदेवानंद सरस्वती एका गावी गेले होते. गावातील एका साात्त्विंक बाईने त्यांना विनंती केली की, ‌‘महाराज, आज आपण आमच्या घरी यावे. ‘स्वामी तिच्या घरी गेले. बरोबर आलेल्या लोकांशी संभाषण चालले होते. स्वयंपाकघरामध्ये त्या बाईने दूध गरम केले व एका चांदीच्या फूलपात्रामध्ये ओतले. दूध ओतताना त्यावरील साय भांड्यामध्ये पडली. त्याबरोबर तिच्या तोंडून ‌‘अरेरे!’ असे शब्द बाहेर पडले परंतु तिने त्यात साखर घातली आणि ते भांडे स्वामींसमोर आणून ठेवले. बराच वेळ झाला तरी स्वामीं दूध प्यायले नाहीत. बाईला वाटले की, दूध गरम असेल म्हणून स्वामींनी ते घेतले नाही पण संभाषण संपले आणि स्वामी परत जायला निघाले तेव्हा बाई म्हणाली, ‌‘महाराज, आपण दूध का घेतले नाही.’ स्वामी म्हणाले, ‌‘नाही, मी ते पिऊ शकत नाही, कारण त्यामध्ये साय व साखर आहेच पण त्याबरोबर आणखी काही तरी मिसळले आहे.’ बाई म्हणाली, ‌‘छे, नाही महाराज. आणखी काही मिसळले नाही’ तेव्हा स्वामी म्हणाले, ‌‘त्यामध्ये अरेरे मिसळले आहे. ते दूध कसे घेऊ?’

कथा उपदेश : साधु पुरुषांना माणसाची शुद्ध अशुद्द भावना बरोबर कळते. तिला अनुसरून त्यांचे प्रत्यक्ष वर्तन घडते.

इतिहासात आजचा दिवस – १८ जानेवारी

अंतरराष्ट्रीय
1419 – इंग्लंडचा राजा हेनी पाचवा याने नॉर्मंडीची राजधानी रुआ जिंकून नॉर्मंडीचा पूर्ण पाडाव केला.
1806 – इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेतील केप ऑॅफ गुड होपचा ताबा घेतला.
1839 – बिटीश ईस्ट इंडिया कंपनीने एडन जिंकले आणी भारत-इंग्लंड समुद्रीमार्ग चाच्यांपासून सुरक्षित केला.
1839 – अमेरिकन गृहयुद्ध – मिल स्प्रिंग्सच्या लढाईत उत्तरेचा विजय.
1915 – पहिले महायुद्ध – जर्मन झेपेलिननी बिटनच्या गेट यारमथ आणी किंग्ज लिन गावांवर बॉम्बफेक केली. हवेतून नागरी वस्तीवर हल्ला झाल्याची ही पहिलीच वेळ.
1918 – फिनीश गृहयुद्ध – लाल सैनिक व पांढरे सैनिक यांच्यात पहिली लढाई.
1941 – दुसरे महायुद्ध – बिटनने एरिट्रिया वर हल्ला केला.
1942 – दुसरे महायुद्ध – जपानने म्यानमार वर हल्ला केला.
1945 – दुसरे महायुद्ध – रशियाने पोलंडमधील लोड शहर नाझींपासून मुक्त केले. युद्धाच्या सुरूवातीला लोकसंख्या – 2,30,000. या दिवशीची लोकसंख्या – 900.
1946 – दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थरने टोक्योमध्ये आंतरराष्ट्रीय सैनिकी न्यायालय सुरू केले.
1977 – मायामी, फ्लोरिडात पहिला आणी (आत्तापर्यंत) अखेरचा हिमवर्षाव.
2007- यूरोपमध्ये वादळाच्या कहर ; 23 जण ठार.
2007- एअरटेलच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सेवेला श्रीलंकेत सुरुवात.
2007- थायलंडमध्ये बस अपघातात 17 ठार.
2008 – अफगाण सीमेला लागून असलेल्या दक्षिण वझिरीस्तान भागात पाकिस्तानी लष्कराने तब्बल 90 तालिबानी अतिरेक्यांना ठार केले.

राष्ट्रीय
1966 – इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी.
2007- भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्त्रो) ने क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी केली.
2008 – रेल्वेने आरक्षणाची मर्यादा वाढवली. रेल्वे मंत्रालयाने 60 दिवसाचा कालावधी वाढवून 90 दिवसाचा करण्याचा निर्णय घेतला.

जन्म
399 – पुल्केरिया, बायझेन्टाईन स्राज्ञी यांचे जन्म.
1736 – जेम्स वॅट, स्कॉटिश संशोधक यांचे जन्म.
1807 – रॉबर्ट ई. ली, अमेरिकन कॉन्फेडरेट सेनापती यांचे जन्म.
1809 – एडगर ऍलन पो, अमेरिकन लेखक यांचे जन्म.
1813 – सर हेनी बेसेमेर, इंग्लिश संशोधक यांचे जन्म.

निधन
1905 – देबेन्द्रनाथ टागोर, भारतीय तत्त्वज्ञानी यांचे निधन.
1990 – रजनीश तथा ओशो, भारतीय तत्त्वज्ञानी यांचे निधन.