Spread the love


शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथे सध्या श्री दत्त साखर कारखान्याचे अद्यावत अग्निशमन केंद्र कार्यरत आहे. शिवाय जयसिंगपुर आणि कुरूंदवाड येथेही अद्यावत अग्निशमन केंद्र कार्यरत आहे. मग शिरोळला नव्या अग्शिमन केंद्राची गरज काय असा सवाल प्रमाणिकपणे कर भरणाऱ्या नागरीकांतुन होत आहे.
पालिकेने हा पैसा इतर ठिकाणी वळवून शिरोळमधील नागरीकांना नव्या काही सुविधा देता येतील काय. यावर लक्ष द्याव, अशी मागणी करदात्यातुन आहे. अभ्यासु माजी नगरसेवकांनीही याचा अभ्यास करावा. सध्या कल्लेश्वर तालवाचे सुशोभिकरण सांभळताना पालिकेला नाकी नऊ येत आहेत. शिवाय श्री पदमाराजे विद्यालया समोरील गाड्यांना अद्याप गाळे मिळाले नाहीत. मग ही उठाठेव का असा सवाल नागरीकातुन उपस्थित होत आहे.