Spread the love

मुंबई,2 जून

महाराष्ट्रातील राजकीय भुकंपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचे अभिनंदंन करुन अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी दुर्लक्ष केले गेल्याचे विधान केले. अजित पवार यांनी विकासाचे राजकारण केले आहे. विकासाच्या राजकारणाला आणि आघाडीला त्यांनी साथ दिली आहे. एका कर्तुत्वान कार्यकर्त्याला जेव्हा दुय्यम स्थान दिले जाते तेव्हा अशा घटना घडतात. याआधीही घटना घडल्या आहेत. आधी महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार होते आता ट्रिपल इंजिन सरकार झाले आहे. आता राज्यातला विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना, मोदी यांचे सरकार सर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे काम करते आहे. जसं महाराष्ट्रात म्हटले जाते की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. अशापद्धीतीने आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. शिंदे यांचा एस सुपरफास्ट होता, फडणवीस यांचा एफ फास्ट होता आणि शदर पवार यांचा पी प्रोग्रेस साठी आम्हाला साथ देईल असं आमचे सुपरफास्ट प्रोग्रेस सरकार असेल असे म्हटले आहे.