Spread the love

जयसिंगपूर बस स्थानकातील अंतर्गत डांबरीकरण झालेच पाहिजे याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी एसटी  बसेस अडवून आंदोलन करण्यात आले.
 वेळो वेळी निवेदन देवून पण एसटी महामंडळाकडून दखल घेतली जात नव्हती.बसस्थानकात उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे व प्रवाशांना तसेच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्वरित डांबरीकरण करावे याकरिता सर्व बसेस रोखण्यात आल्या. यावेळी आगर प्रमुख पलंगे यांनी आंदोलन स्थळी भेट देवून आठ दिवसात डांबरीकरणाचे काम सुरू होईल असे सांगितले यावर आंदोलन मागे घेण्यात आले 
यावेळी तालुका अध्यक्ष शैलेश आडके, सागर मादनाईक, शैलेश चौगुले, शंकर नाळे,वासुदेव भोजने, ऋतुराज सावंत देसाई,विजय नलवडे, आकाश मादनाईक,सचिन मिसाळ,संजय मादनाईक,अमित मगदूम, सतीश कोळेकर,रतनदीप चौगुले,वृषभ मादनाईक उपस्थित होते.