इचलकरंजी प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा
श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेने समाजामध्ये विश्वासाची नाळ तयार केली आहे, याच विश्वासाला बळ देत कुरुंदवाड परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानाला झळाली देण्यासाठी संस्थेने प्रयत्न करावा, त्याचबरोबर आर्यचाणक्य पतसंस्थेस या परिसरातील नागरिक चांगला प्रतिसाद देतील असे अभिवचन आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.
श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, इचलकरंजी यांच्या ८ व्या कुरुंदवाड शाखेचा शुभारंभ आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), यांच्या हस्ते
करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून रामचंद्र डांगे, शरदचंद्र पराडकर, भालचंद्र पुजारी , सागर चौगुले, अरविंद मजलेकर, धनपाल आलासे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र राशिनकर होते उपाध्यक्ष पंकज मेहता तसेच संस्थापक अध्यक्ष जवाहरजी छाबडा व्यासपीठावर उपस्थित होते. सध्या संस्थेच्या 235 कोटी इतक्या ठेवी असून संस्थेने एकूण 145 कोटी इतके कर्ज वाटप केलेले आहे. तसेच संस्थेचे रुपये 125 कोटी इतकी गुंतवणूक असून निव्वळ NPA 0% आहे. पतसंस्थेमध्ये घरकुल कर्ज, सोलर कर्ज, तसेच रुपये 80 हजारापर्यंत कमीतकमी व्याजदरात सोने तारण कर्ज ही योजना सुरू आहे असे अध्यक्ष राशिनकर साहेब यांनी बोलताना सांगितले. संचालक रामकिशोर भुतडा यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.
सदर कार्यक्रम नामदेव मंडप, बाजारपेठ, बहिरेवाडी रोड, कुरुंदवाड येथे झालेल्या कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ,पदाधिकारी, अधिकारी, सेवक वर्ग,सभासद, हितचिंतक, तसेच कुरुंदवाड पंचक्रोशीतील मान्यवर नागरिक उपस्थित होते.
