लखनऊ / महान कार्य वृत्तसेवा
लग्नानंतर, वधू आणि वर लग्नाची रात्र साजरी करून त्यांचे वैवाहिक जीवन सुरू करतात. ते नेहमीच हा खाजगी क्षण संस्मरणीय बनवू इच्छितात. लग्नानंतरची पहिली रात्र प्रत्येक पती-पत्नीसाठी खास असते. मध्य प्रदेशच्या राजगड इथं राहणाऱ्या एका तरुणाने लग्नानंतर अशीच स्वप्नं पाहिली होती. लग्नानंतर तो उत्साहात लग्नाची पहिली रात्र साजरी करण्यासाठी रूममध्ये गेला. पण काही वेळाने किंचाळू लागला.
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील बाभनी पोलीस स्टेशन परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. 27 मे रोजीची ही घटना आहे. एका कपलचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. पण लग्नाच्या रात्रीच्या अगदी आधी नवरीने असं काही केलं की तिच्या सासरच्या लोकांना धक्का बसला.
लग्नाची पहिली रात्र साजरी करण्यासाठी नवरदेव खोलीत गेला. नवरदेव खोलीत जाताच वधू म्हणाली, मला काही काम आठवलं आहे, मी ते करून लगेच परत येईन. यानंतर ती घराबाहेर गेली. वर खोलीत तिची वाट पाहत राहिला. पण वधू काही आलीच नाही. शेवटी तिचा शोध सुरू झाला. तेव्हा कुटुंबाला कळलं की ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. नवविवाहित वधू लग्नाच्या काही तासांनंतरच तिच्या प्रियकरासोबत बाईकवरून पळून गेली.
हे ऐकून वराला आणि त्याच्या कुटुंबाला खूप धक्का बसला. त्याने ताबडतोब मुलीच्या पालकांना याबद्दल माहिती दिली, त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, वधू आणि तिच्या प्रियकराला गोंधळाची माहिती मिळाल्यावर प्रियकराने तिला तिच्या पालकांच्या घरी परत पाठवलं. पण आता ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत तिच्या आईवडिलांच्या घरी राहण्याचा आग्रह धरू लागली. हे प्रकरण पंचायतीकडे नेण्यात आलं.
शुक्रवारी तिन्ही गावांचे प्रमुख, ग्रामस्थ आणि दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत पंचायत झाली. पंचायतीत असा प्रस्ताव ठेवण्यात आला की मुलीच्या प्रियकराला लग्नात झालेल्या सुमारे तीन लाख रुपयांच्या खर्चाची भरपाई करावी लागेल आणि तो मुलीला सोबत घेऊन जाऊ शकेल. याशिवाय, वराच्या बाजूने मिळालेल्या वस्तू देखील प्रियकराला सुपूर्द केल्या जातील.
मात्र, प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दिला. तो म्हणाला, हा खर्च उचलणं त्याच्यासाठी शक्य नाही. जेव्हा कोणतंही एकमत झाला नाही, तेव्हा वराच्या बाजूने सांगितलं की ते या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात करतील.
