मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
1970 मध्ये दशकांमध्ये आध्यात्मिक गुरु ओशो यांना भगवान रजनीश म्हणायचे. लाखोंच्या संख्येनं त्यांचे अनुयायी होते. अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार ते जे काही सांगायचे त्यानं प्रेरित झाले. अभिनेता विनोद खन्ना यांनी तर त्यांचं अभिनय क्षेत्रातील करिअर संपवलं आणि ओशो यांच्या समुदायात राहण्यासाठी अमेरिकेत गेले. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी देखील ओशोंच्या विचारांचे पालन केले. ओरेगन जाण्याआधी ओशो यांनी पुण्यात त्यांच्या आश्रमात उपदेश दिला होता. जिथे पटकथा लेखक जावेद अख्तर हे देखील सहभागी झाले होते.
पुण्यात ओशोंच्या प्रवचना गेले जावेद अख्तर
जावेद अख्तर यांनी लल्लनटॉपला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की इतक्या वर्षात ते फक्त एकदाच आश्रमात गेले. त्यावेळी पुण्यातील त्यांच्या काळाविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की ‘सकाळी 8 ते 9:30 पर्यंत त्यांचं प्रवचण सुरु असायचं. इतकंच नाही तर ते स्वत: ला नास्तिक असल्याचं मानत असणारे जावेद अख्तर म्हणाला की, ते ओशो यांचे अनुयायी नव्हते. पण त्यांनी जे काही शिकवलं ते योग्य होतं असं सांगत ते म्हणाले कारण ओशो हे कोणत्या एका विशिष्ठ विचारधारणेला बढावा देत नव्हते. जावेद यांच्याकडे एक हॉटेल आहे आणि प्रत्येक दिवशी प्रवचन ऐकण्यासाठी ते 10 रुपयांचं तिकिट काढायचे. त्यासोबत 20-22 दिवस ते डायलॉग लिहिण्याचं काम करायचे.’
ओशो एकाच विषयाला चिकटून राहत नव्हते
त्यांनी सांगितलं की ओशो हे एक विद्वान प्रोफेसर होतो जे वेगवेगळ्या विषयांवर बोलायचे आणि प्रत्येक दिवसाला त्यांचे विचार हे बदलत राहायचे. जावेद अख्तर यांनी हे देखील सांगितलं की ओशोचे काही विचार हे अजूनही त्यांना आठवण आहेत. जावेद अख्तर यांनी सांगितलं की ते बाबा रामदेव यांना देखील आधी भेटलेत आणि हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लेकीला त्यांनी लांबूनच अभिनंदन केलं होतं.
जावेद अख्तर यांनी सद्गुरू जग्ग यांची दोन वेळ भेट घेतली आहे. पण त्यानंतर त्यांच्याशी नंतर भेट झाली नाही. त्यांनी ऐकलं आहे की जावेद अख्तर यांना आमंत्रित केलं तर ते कार्यक्रमात येणार नाही अशी चरचा आहे. खरंतर, त्यांना विश्वास नाही की हे सत्य आहे की नाही. जावेद यांनी सांगितलं की त्यांना कोणतीही अडचण नाही आणि त्यांना पुन्हा भेटून आनंद होईल.
