Spread the love

बीड / महान कार्य वृत्तसेवा

बीड जिल्ह्यात पुन्हा अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चहा पाजतो, असे म्हणून अप्पा काशिनाथ राठोड या माजलगाव तालुक्यातील जीवनापूर येथील व्यक्तीला दुचाकीवरून दूर नेले. तेथे पाच ते सहा जणांनी दारू पाजली. नंतर वाहनातून अपहरण करून राठोड यांना सात तास बेदम मारहाण (ण्ीग्स ऱ्ेौ) केली. यात जखमीच्या डोक्यात सात टाके पडले असून, अंगावर सर्वत्र वण उमटले आहेत. हा प्रकार 18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता घडला. यातील जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मारहाण करतानाचा गुंडांनी व्हिडीओही बनवला

दरम्यान, या मारहाणीच्या घटनेत गुंडांनी मारहाणीचा व्हिडीओ बनवल्याचीही माहिती समोर आली आहे. तर हाच व्हिडीओ व्हायरलची धमकी दिल्याचेही आप्पा राठोड यांनी सांगितलंय. 18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता अपहरण करून पहाटे 3 वाजता सोडले. यादरम्यान खूप मारहाण करून व्हिडीओ बनवले, असेही ते म्हणाले. दरम्यान या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणात फिर्यादी असलेल्या आप्पा राठोड याच्यावरच वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची ही माहिती समोर आली असून आता हा प्रकार नेमका काय आणि कशामुळे घडला? हे तपासात समोर येऊ शकणार आहे.

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री घेणार मुंबईत बैठक

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार असणार असून जिल्ह्यातील सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलावले जाणार आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय. मारहाणीचे व्हिडिओ सोशल माध्यमात वायरल होत आहेत. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी कोणाचीही गय केली जाणार नाही. असं ठणकावून सांगितले असून पोलिसांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. याकरिता मुख्यमंर्त्यांसोबत ही बैठक असणार आहे.