मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राज्यातील महायुती सरकारमध्ये आज छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. साडेचार महिन्यापूर्वी झालेल्या शपथविधी सोहळ्यात मंर्त्यांच्या यादीतून भुजबळांच्या नावावर फुली मारण्यात आली. आज मात्र भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तर, दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर दमानियांनी वार केला असून पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेचा हवाला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता भुजबळांची एन्ट्री होणार आहे. अंजली दमानिया यांनी भुजबळांच्या मंत्रीपदाला विरोध करत संताप व्यक्त केला आहे. वाह फडणवीस वाह !म्हणजे एका भष्ट मंर्त्याच्या जागी दुसरा भष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ? अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दमानिया यांनी म्हटले की, हेच भुजबळ जेव्हा जेल मधे होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, अशी मोठी खंत दमानिया यांनी व्यक्त केली.
अंजली दमानिया यांनी काय म्हटले?
छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ?
वाह फडणवीस वाह !
म्हणजे एका भष्ट मंर्त्याच्या जागी दुसरा भष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ?
असा काय नाईलाज आहे ?
की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात ?
आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मधे होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ?
म्हणजे एका भष्ट मंर्त्याच्या जागी दुसरा भष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ?
किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
खालच्या घोषणा आठवतात ?
”भष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार 400 पार”
”भष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम”
हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ?
