Spread the love

दिल्लीच्या निकालांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
दिल्लीमध्ये भाजपाचा विजय झाला आहे. 27 वर्षांनी दिल्लीमध्ये कमळ फुलले आहे. भाजपाने आपला धोबीपछाड दिला आहे. काँग्रेसला या निवडणुकीत 1 आमदार ही संख्याही गाठता आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीत भाजपाला स्पष्ट बहुमत
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. एकीकडे आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावला जात होता तर दुसरीकडे भाजपाकडून दिल्लीतील 25 वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता. काँग्रेस आणि आप यांच्यात न झालेल्या युतीचा भाजपाला फायदा होईल असं मानलं जात होतं. तेच निकालांमध्ये घडलं आहे. 8 फेब्रुवारीला लागलेल्या निकालांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दरम्यान आप आणि काँग्रेस यांच्यातलं भांडण भाजपाचा फायदा करणारं ठरलं आहे यात शंकाच नाही.
काय म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी?
जनशक्ती सर्वेपरि! विकास, सुशासन यांचा विजय झाला आहे. दिल्लीच्या सगळ्या भावा-बहिणींना मी वंदन करतो आहे. आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. दिल्लीचा चौफेर विकास केला जाईल यात शंकाच नाही. दिल्लीकरांचं आयुष्य उत्तम होईल, यासाठी आम्ही कुठलीही कसर सोडणार नाही. विकसित भारताच्या निर्मितीत दिल्लीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मला भाजपाच्या कार्यकर्त्यांवरही गर्व आहे ज्यांनी हा विजय मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. दिल्लीकरांची सेवा करण्यासाठी आम्ही आता अधिक बळकटीने काम करु अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी केली आहे.