Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या‍ कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला टाकवडे येथे गळती लागल्याने पाणी उपसा बंद ठेवण्यात आला आहे.त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.

 इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा योजनेच्या वितरण नलिकेला सतत गळती लागत असल्याने त्याचा शहराच्या पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होत आहे. या योजनेच्या वितरण नलिकेला टाकवडेनजीक लक्ष्मी मंदिर परिसरात गळती लागली आहे.