Spread the love


पुणे,27 मे
गाडीतील महिला प्रवाशांनी सुप्रिया सुळे यांची गाडी येताना पाहून ती थांबविली आणि आपल्या अडचणी सांगितल्या. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वत:च्या गाडीत लहान मुले, महिला आणि वृद्धांना भोरपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. त्या स्वत: गाडीतून उतरल्या आणि येणाèया-जाणाèया गाड्यांना हात दाखवून त्यांना प्रवाशांना सोडण्याची विनंती केली. वाहनचालकांनीही त्यांच्या विनंतीचा मान राखून प्रवाश्यांना आपल्या वाहनात बसविले.
प्रवाश्यांकडून कौतुक: खासदार सुप्रिया सुळे यांनी कुणाला भोरपर्यंत तर कुणाला खेड शिवापूरपर्यंत सोडण्याची व्यवस्था केल्यानंतर प्रवाशांच्या चेहèयावर आनंद उमटला. एवढ्या मोठ्या राजकीय नेत्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी स्वत: रस्त्यावर उतरून गाड्यांना हात दाखवून सर्वसामान्य लोकांप्रमाणे विनंती केली. संकटात सापडलेल्या प्रवाश्यांची अडचण दूर केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समाजसेवेचे उदाहरण केले सादर: सुप्रिया सुळे यांनी दाखविलेला साधेपणा आणि प्रवाशांबद्दलची आपुलकी पाहता सर्वच आश्चर्यचकित झाले. काही चारचाकी गाड्यांनासुद्धा हात दाखवून त्यांनी प्रवाशांना नियोजित स्थळी सोडण्याची विनंती केली. तसेच एका एसटी बसलासुद्धा हात केला. ही एसटी बस सांगलीला जाणार होती. परंतु, खाली थांबलेले प्रवासी भोरचे असल्याने त्यांना शिवापूर टोलनाक्यापर्यंत तरी सोडा, अशा सूचना सुप्रिया सुळेंनी दोन्ही चालक वाहकांना केल्या. सर्व प्रवासी जाईपर्यंत कात्रज घाटामध्ये स्वत: थांबून त्यांनी सामाजिक कर्तव्य बजावले. राजकीय पक्षाचा नेता हा सर्वसामान्यांच्या अडचणींमध्ये मदत करणारा असला पाहिजे, याचे उदाहरण त्यांनी यातून घालून दिले. प्रवाशांनीही सुप्रिया सुळेंचे आभार मानून तेथून निरोप घेतला.
शेतकèयांच्या मदतीची सरकारकडे याचना: एप्रिल महिन्यात राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकळ घातला होता. अशा स्थितीत शेतकèयांना मदत मिळणे गरजेचे होते. सरकार पंचनामे करून मदत देतो अशी घोषणा करत आहे. शेतकèयांची परिस्थिती खूप चिंताजनक आहे. सरकारने शेतकèयांना तातडीने मदत देण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. याविषयी सरकार असंवेदनशील असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे पवार यांनी आज केली आहे.
तर हे झालेच नसते: सुप्रिया सुळे यांनी आज कात्रज भागामध्ये विकास कामाची पाहणी केली. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सरकारकडून आणखी काही अपेक्षा नाही, नाशिकच्या आदिवासी आणि शेतकèयांनासुद्धा मोर्चा काढत पायपीट करत यावे लागले. अगोदरच त्यांच्या समस्या सोडवल्यास त्यांनी त्यांना हवा तो भाव दिला असता, तर हे झालेच नसते; पण सरकार ते पोहोचेपर्यंत वाट बघतील. त्यामुळे हे सरकार किती शेतकèयांविषयी असंवेदनशील आहे, हे दिसून येत आहे. शेतकèयांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेणे गरजेचे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.