filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 359.2746;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;
Spread the love

म्हासूर्ली-चौधरवाडी रस्त्यावर जीवघेणा प्रवास

राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा (अरविंद पाटील)

 सावधान! आपण जर म्हासूर्ली-चौधरवाडी रस्त्याने प्रवास करत असाल तर जीव मुठीत घेऊन जावा, अन्यथा तुम्हाला अपघातास सामोरे जावे लागेल. राधानगरी तालुक्यातून गगनबावडा तालुक्याला जोडणारा म्हासूर्ली-चौधरवाडी परिसरातील अवघ्या 250 मीटरचा रस्ता सरकारी अनास्थेचा बळी ठरला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा रस्ता सध्या मरणासन्न अवस्थेत आहे.

गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून या रस्त्याचे घोंगडे भिजत पडलेले असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ते गगनबावडा तालुक्यातील चौधरवाडी बंधाऱ्यादरम्यान हा रस्ता आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखल, खड्ड्यांचे साम्राज्य तयार होते. येथून वाहतूक करणे जिकिरीचे ठरत आहे. गेले अनेक वर्ष येथे छोटे-मोठे अपघात घडत असून एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान चार महिन्यापूर्वी येथे शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. आणि या रस्त्याच्या भुसंपादनाचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवल्याचे समजते. परंतु “सरकारी काम आणि जरा थांब” हे सर्वश्रुत आहे. किमान हा रस्ता होण्यापूर्वी सध्यघडीला आता प्रवाश्यांचा सुरक्षिततेसाठी या रस्त्यावर प्रशासनाने मुरूम टाकून सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.

परिते-राशिवडे -चांदे-कोतेमार्गे म्हासुर्ली-धुंदवडे अणदूर गावातून जाणारा हा रस्ता गगनबावडा तालुक्यातील शेणवडे येथे कोल्हापूर-गगनबावडा ते कोकण महामार्गाला जोडणारा अंतर्गत जिल्हा मार्ग आहे. गगनबावड्याकडे जाणारा कमी अंतराचा हा मार्ग असल्याने सर्वसामान्यांबरोबर पर्यटकांची वर्दळ या मार्गावर मोठी असते. आतापर्यत या मार्गावर इतर ठिकाणी शासनाने रस्त्यावर खर्च केला आहे. मात्र याच मार्गावरील म्हासुर्ली बाजारपेठ ते धामणी नदी अलीकडील चौधरीवाडी दरम्यान सुमारे 250 मीटरचा रस्ता याला अपवाद ठरला आहे. हा रस्ता पूर्ण कच्चा आणि  दगड धोंड्यांचा आहे. 

यापैकी नदीपलीकडील चौधरवाडी हद्दीतील रस्ता गगनबावडा सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखोंचा निधी खर्च करत तिन वर्षांपुर्वी रुंदीकरणासह डांबरीकरण करून केला आहे. मात्र राधानगरी तालुक्याच्या हद्दीतील म्हासुर्ली बाजारपेठ चौक ते धामणी नदीवरील बंधाऱ्यापर्यतचा रस्ता अनेक वर्षापासून पक्का होण्याच्या प्रतीक्षेत आहे आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरुन पावसाचे मोठ्या प्रमाणावर वाहणारे पाणी, दोन्ही बाजूंनी वाढलेली झुडपे, चिखल, मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीस धोका निर्माण होतो. शिवाय रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यामुळे या रस्त्याचा भाग खचतो. तुंबलेल्या पाण्यामुळे खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे लहान मोठे अपघात घडतात. 

सध्या या मार्गावरून अवजड 

वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. वाहनधारकांना पर्याय ठरणाऱ्या भित्तमवाडी-गवशी बंधाऱ्यावरून सुमारे सहा किलोमीटरचा वळसा घालून कोकण व गगनबावड्याकडे प्रवास करावा लागत आहे.  गावातील  नाल्यांचे सांडपाणी याच रस्त्यावरून वहात आहे. परिणामी 250 मीटरचा मार्ग धोकादायक बनला आहे. येथून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. या रस्त्याच्या विकासाकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याच्या प्रतिक्रिया वाहनधारक प्रवासी व्यक्त करत आहेत.