Spread the love


मुंबई 4 फेबुवारी
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना डॅमेज करायचं हे छगन भुजबळांना वाटतं आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. आम्ही काही त्याच्याकडे लक्ष देत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. भुजबळांना वाटतंय सगळे ओबीसी बांधव उपाशी मेले पाहिजेत. त्यामुळे आम्ही अशा माणसाकडे लक्षच दिसत नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
”त्ूा राजीनामा दे, समुद्रात उडी मार, काहीही कर आम्हाला काय घेणं देणं आहे. डोक्यावर घेऊन फिर राजीनामा. त्ूा मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलला तर त्ुाला सोडत नसतो मी. राजीनामा दिला म्हणजे काय उपकार केले का आमच्यावर? आम्हाला काय करायचं त्याच्याशी? त्ूा मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. येवल्याचं त्ो लय विचित्र आहे. सगळ्या पक्ष मोडायचं हेच त्याला माहीत आहे. ज्या पक्षाने त्याला मोठं केलं तो पक्षही त्याने मोडला. सरकारही मोडायचं असं दिसतंय. माझी सरकारला विनंती आहे जेवढी त्याची (छगन भुजबळ) गरज आहे त्ोवढी मराठ्यांचीही असू द्या.” असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
छगन भुजबळ काय म्हणाले?
ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले, ”सरकारमधले काही लोक, विरोधी पक्षातले काही नेत्ो माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विरोधक मला म्हणतायत की, सरकारचे निर्णय पटत नाहीत तर मग राजीनामा द्या. सरकारमध्ये का राहता? सरकारवर टीका करता आणि त्याच सरकारमध्ये कसे काय राहता? हिंमत असेल तर राजीनामा द्या. काल कोणीतरी बोललं या भुजबळला लाथ घालून मंत्रिमंडळाबाहेर काढा, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला बाहेर हाकला. मला या सर्वांना, माझ्या विरोधकांना, स्वपक्षातील आणि स्वसरकारमधील लोकांना सांगायचं आहे की मी आधीच राजीनामा दिला आहे.”